Posts

Showing posts from December, 2024

दिन ब दिन बढ़ता जा रहा है किसानों का रुझान मिट्टी परीक्षण की ओर !

Image
  दिन ब दिन बढ़ता जा रहा है किसानों का रुझान मिट्टी परीक्षण की ओर ! नमस्कार किसान भाइयों, इस लेख में हम जानेंगे कि मिट्टी परीक्षण (Soil Testing) क्यों जरूरी है और इससे क्या फायदे होते हैं। मिट्टी परीक्षण आज की आवश्यकता बन गया है। खेत में बेहतर उत्पादन लेने के लिए मुख्य उर्वरकों के साथ-साथ सूक्ष्म पोषक तत्वों की भी जरूरत होती है। मिट्टी का स्वास्थ्य सुधारने, उसकी उर्वरता बढ़ाने, मिट्टी की संरचना में सुधार करने, मिट्टी में उपलब्ध सूक्ष्मजीवों की जानकारी प्राप्त करने और अधिक उत्पादन लेने के लिए मिट्टी परीक्षण करना बहुत जरूरी है। किसान भाई अक्सर क्या करते हैं? बेहतर फसल वृद्धि के लिए रासायनिक उर्वरकों का ज्यादा इस्तेमाल करते हैं। लेकिन हम इस बात पर ध्यान नहीं देते कि जिस मिट्टी में यह फसल उगने वाली है, उसे भी उसकी जरूरत के अनुसार पोषक तत्व उपलब्ध कराना जरूरी है। एक नियम यह कहता है कि यदि फसल को सभी पोषक तत्व समय पर दिए जाएं और उनमें से कोई एक भी घटक कम हो जाए, तो कुल उत्पादन में गिरावट आती है। इसका मतलब यह है कि मिट्टी में मौजूद सभी पोषक तत्वों का समान महत्व है। मिट्टी परीक्षण का अर्थ...

बैंगन की खेती से पाएं "लाखों का मुनाफा"

Image
  बैंगन की खेती से पाएं "लाखों का मुनाफा" नमस्कार किसान भाइयों, भारत में बैंगन सबसे ज्यादा उपयोग की जाने वाली सब्जी है। इसकी खेती सालभर की जा सकती है। लेकिन, अच्छी और गुणवत्तापूर्ण पैदावार के लिए सही तकनीक का उपयोग करना जरूरी है। इस लेख में हम बैंगन की खेती के विभिन्न पहलुओं पर चर्चा करेंगे। Growth Stages of Brinjal Crop भूमि का चयन  बैंगन की खेती के लिए उपजाऊ और अच्छे जल निकास वाली मिट्टी का चयन करें। मिट्टी का पीएच (pH) स्तर 6.5 से 7.5 के बीच होना चाहिए। मौसम  इस फसल के लिए सूखा और ठंडा मौसम सबसे उपयुक्त होता है। ऐसे वातावरण में फसल बेहतर होती है। फसल का मौसम बैंगन की खेती तीनों मौसमों में की जा सकती है। खरीफ मौसम - जून-जुलाई रबी मौसम - अक्टूबर-नवंबर गर्मी मौसम - जनवरी-फरवरी बैंगन की किस्मों का चयन कैसे करें?  महाराष्ट्र में बैंगन की किस्में क्षेत्र और मांग के अनुसार भिन्न होती हैं। किसानों को अपनी आवश्यकता और क्षेत्र के अनुसार किस्मों का चयन करना चाहिए। अधिक उत्पादन वाली और रोग प्रतिरोधक क्षमता वाली किस्मों का चयन करें। प्रमुख किस्में (Varieties of Brinjal Crop) म...

वांगे पिकातून मिळवा "लाखोंचे उत्पन्न"

Image
वांगे पिकातून मिळवा "लाखोंचे उत्पन्न"  नमस्कार शेतकरी मित्रांनो,  वांगी हा भारतात सर्वाधिक वापरला जाणारा भाजीपाला आहे. त्याची लागवड वर्षभर करता येते. मात्र, भरघोस व गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी योग्य तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. या लेखामधून आपण वांगे पिकाच्या लागवडीसंदर्भात चर्चा करणार आहोत.  Growth Stages of Brinjal Crop जमिनीची निवड -   वांगी लागवड करताना सुपीक, आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमीन असावी त्यामुळे चांगले उत्पादन मिळते. जमिनीचा पीएच (pH) साधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान असणे आवश्यक आहे. हवामान -   या पिकासाठी कोरडे व थंड हवामान आवश्यक असते. अशा वातावरणामध्ये पीक चांगले होते. लागवडीचा हंगाम -  वांगी पिकाची लागवड ही तिन्ही हंगामात करता येते. - खरीप हंगाम - जून- जुलै महिन्यात  - रब्बी हंगाम - ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात - उन्हाळी हंगाम - जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात  वांग्याच्या जातींची निवड कशी करावी ? शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात वांग्याच्या जाती ह्या वांग्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आहेत , हे तर आपणास ठाऊकच आहे...

उसामध्ये एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादनाचे उद्दिष्ट गाठायचं आहे.....

Image
उसामध्ये एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादनाचे उद्दिष्ट गाठायचं आहे.....                           ऊस पिकाला नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते . याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी केले जाते. ऊस पिकामध्ये योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 100 टनाहूनही अधिक उत्पादन मिळू शकते.  उसाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी जसे जमिनीची योग्यप्रकारे मशागत करणे, खतांचा संतुलित पुरवठा करणे, रोग व कीड व्यवस्थापन करणे, पाण्याचे नियोजन करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे उसाच्या बेण्याची बेणे प्रक्रिया करणे किंवा जर आपण रोपे लावत असु तर लागवडीपूर्वी त्यांची प्रक्रिया करणे.  ऊसाचे बेणे म्हणजे कापलेल्या ऊसाचे बारीक तुकडे होय. ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रिया का महत्त्वाची आहे? ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रियेचे महत्त्व खूप मोठे आहे कारण ती पीक उत्पादन, गुणवत्ता आणि रोग नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. खाली दिलेल्या कारणांमुळे ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रिया महत्त्वाची ठरते: रोगप्रतिबंधक उपाय: बेणे प्रक्रियेद्वारे ऊसाच्या बेण्यातून प...

"पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे"

Image
आपणास ठाऊक आहे का? "पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे" पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे फार महत्त्वाचे असते.  त्यामुळे पिकास आवश्यक असलेली मुख्य दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो तसे जमिनीची सुपीकता वाढवण्यास व टिकून ठेवण्यास मदत होते. तसेच पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता कमी झालेली कमी झालेली दिसते. मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस जमिनीत व पिकांवर कमतरतेची लक्षणे आढळून येतात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर की दिसून येतो. अन्नद्रव्यांचे कार्य (Functions of plant Nutrients) 1) नत्र (Nitrogen) - पानांतील हरिद्रव्ये व प्रथिने वाढवतात. - पिकांची शाखीय वाढ चांगली होते. - पानांची व खोडाची वाढ झपाट्याने होते. 2) स्फुरद (Phosphorus) - पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे  - बियाण्यांची उगवण, फळधारणा आणि फळाच्या परिपक्वतीसाठी आवश्यक असते. 3) पालाश (Potassium)  - उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.  - फळांना चांगला र...

माती परीक्षणाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Image
माती परीक्षणाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?  नमस्कार शेतकरी मित्रांनो,  आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की माती परीक्षण (Soil Testing) करणे का गरजेचे आहे? माती परीक्षण केल्याने काय फायदे होतात?           माती परीक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. शेतामध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी मुख्य खतांबरोबरच सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या हेतूने, जमिनीची सुपीकता वाढवणे, जमिनीचा पोत सुधारणे, जमिनीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची उपलब्धता तपासणे (Microorganism's Availability in soil) व भरघोस उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण करणे फार आवश्यक असते. शेतकरी मित्रांनो आपण नेहमी काय करत असतो की जोमदार पीक वाढीसाठी रासायनिक खतांवर भर देत असतो पण आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही की ज्या जमिनीत हे पीक वाढणार आहे त्याच जमिनीला तिची आवश्यक असलेली अन्नद्रव्य मिळवून देणे हेही फार महत्त्वाचे असते. शेतातील एक नियम असा सांगतो की,  आपण आपल्या पिकाला सगळे पोषक घटक वेळेवर दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पादनात घट होत असते.  ...

हरभऱ्याच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी असे करा खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन.

Image
हरभऱ्याच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी असे करा खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन.   नमस्कार शेतकरी बांधवांनो, Khetiwalebhaiya ह्या ब्लॉग  मध्ये   आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आज आपण हरभरा पिकातील खत व फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून या पिकामधून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावयाचे असल्यास अधिक उत्पन्न देणार्‍या वाणा बरोबर योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 15% उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. हरभरा पिक हे कमी खर्चातलं पीक आहे तसेच कमी खर्चातही भरपूर उत्पादन या पिकाचं मिळवता येतं. - हरभरा हे द्विदल पीक (Dicot Plant) असून द्विदल पिकांच्या मुळावर नत्र स्थिरीकरणासाठी गाठी असतात.  - हे द्विदल पीक हवेतील नायट्रोजनचा वापर करून नत्राची गरज भागवत असतात.  - या कारणाने हरभरा पिकाला नत्राची खूपच कमी गरज भासते. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- खत व्यवस्थापन :-  खरीप हंगामामध...

काळाची गरज बनतेय विषमुक्त शेती !! (Residue Free Farming)

Image
  काळाची गरज बनतेय विषमुक्त शेती !! (Residue Free Farming)                        कमी खर्चात, कमी श्रमात जास्त उत्पादन काढणे ही काळाची गरज आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक औषधांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निरोगी व सदृढ भारतासाठी शेतकऱ्यांनी आता विषमुक्त / अवशेष मुक्त शेती करणे हि काळाची गरज बनलेली आहे.   शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीसाठीचा होणारा खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. हे शेतीसाठी तसेच मानवाच्या आरोग्यासाठी हि धोकादायक आहे. म्हणून सर्वांनी सेंद्रिय शेती / अवशेषमुक्त शेतीस प्राधान्य द्यायला हवे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. खरेदीदार कमीतकमी रासायनिक अवशेष आणि उच्च पोषण मूल्यांसह असणाऱ्या उत्पादनांची निवड करत आहेत. एका प्रक्रियेला दुसऱ्यापेक्षा चांगले म्हणणे अयोग्य ठरेल, परंतु सेंद्रिय शेतीची एक विशिष...

द्राक्ष बागेत एकरी १५ टन उत्पादन मिळवा, संजीवकांच्या (Plant Growth Regulators) मदतीने !

Image
  द्राक्ष बागेत एकरी  १५ टन  उत्पादन मिळवा, संजीवकांच्या (Plant Growth Regulators) मदतीने !   नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो,             द्राक्ष बागेत फळ छाटणी (October Pruning) केल्यानंतर चांगल्या प्रतीचे द्राक्ष मिळवणे हा खूप महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानुसार नियोजन केले जाते. यामध्ये जमिनीची परिस्थिती व त्यानुसार वेलीचे पोषण अन्नद्रव्याच्या माध्यमातून करणे फार गरजेचे असते. वेलीचे पोषण चांगले झाले तरी घडाच्या विकासात मात्र संजीविकेही ( Plant Growth Regulators)  तितकेच महत्त्वाचे असतात. द्राक्ष घडाच्या विकासाच्या अवस्थेत अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते. वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यासाठी वेलीची मुळेही सक्षम असावी लागतात. जोपर्यंत मुळे कार्यरत होत नाही तोपर्यंत अन्नद्रव्यांचे पूर्तता करूनही उपयोग होत नाही.  द्राक्ष बागेत अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापना बरोबरच संजीवकांचा वापर द्राक्ष पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत करणे फार महत्त्वाचे असते. द्राक...

कांदा पिकात सिलिकॉनचा वापर ठरतोय फायदेशीर - उत्पादनात होत आहे लक्षणीय वाढ !

Image
  कांदा पिकात सिलिकॉनचा वापर ठरतोय फायदेशीर - उत्पादनात होत आहे लक्षणीय वाढ !                  शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कांदा पिकामध्ये, सिलिकॉन (Orthosilicic Acid - 2.0 % ) किती महत्त्वाचे आहेत व त्याच्या योग्य वापरामुळे उत्पादनात किती लक्षणीय वाढ होऊ शकते.  सिलिकॉन (Orthosilicic Acid- 2.0 %) च्या वापराने कांदा पिकामध्ये नायट्रोजन युक्त खतांची उपलब्धता 20 ते 40 टक्क्यांनी, फॉस्फरस युक्त 40 ते 60 टक्क्यांनी, आणि पोटॅशियम युक्त खतांची उपलब्धता 20 ते 30 टक्क्यांनी वाढते. - योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे कांदा उत्पादनात निश्चितच वाढ होते.  - पिकांना सिलिकॉन हा जमिनीतून उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनात घट होते, रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सिलिकॉन (Orthosilicic Acid- 2.0 %) च्या फवारणीमुळे कांदा पिकामध्ये होणारे फायदे -  ✅ सिलिकाॅनची फवारणी क...

गांडूळ खत ठरतंय शेत जमिनीसाठी वरदान !

Image
               गांडूळ खत ठरतंय शेत जमिनीसाठी वरदान !                               गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळाला 'शेतकऱ्याचा मित्र' असेही म्हटले जाते . तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून ते वनस्पतीची किड व रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्...

डाळिंब पिकाला द्या तेल्या रोगापासून मुक्ती - करा योग्य नियोजन आणि मिळावा प्रभावी उत्पादन

Image
डाळिंब पिकाला द्या तेल्या रोगापासून मुक्ती - करा योग्य नियोजन आणि मिळावा प्रभावी उत्पादन  नमस्कार शेतकरी बांधवांनो,              आज आपण डाळिंब पिकातील तेल्या म्हणजेच Bacterial Blight या रोगाबद्दल माहिती घेणार आहोत. डाळिंब पीक हे मुरमाड जमीन व कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येते. काळी माती पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच जास्त आर्द्रता युक्त हवामान पिकास पोषक नसते म्हणूनच, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. तसे डाळिंब बागेतील अस्वच्छता,  झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे देखील डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. डाळिंब पिकातील तेल्या हा रोग (Xanthomonas axonopodis) या जिवाणूमुळे होतो. हा रोग पाने, फुले, फळ, फांदी आणि खोड यांचे नुकसान करतो. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तेल्या रोगाची लक्षणे (symptoms) - डाळिंबाच्या पानांनवर हा आजार झाला कि पिवळे रंगाचे रिंग अशे आकार तयार ह...