Posts

Showing posts from September, 2025

सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ !

Image
  सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ !  शेतकरी बांधवांनो, आपण खतं घालतो, पिकांना पाणी देतो तरी कधी कधी झाडांना आवश्यक अन्नद्रव्यं (NPK, सूक्ष्म अन्नद्रव्ये) नीट मिळत नाहीत. कारण जमिनीत असलेली बर्‍याच अन्नद्रव्यं झाडं थेट शोषू शकत नाहीत. इथेच मायकोरायझा नावाचा सूक्ष्म मित्र झाडांच्या मुळांना मदत करतो. आता आपणास प्रश्न पडला असेल काय आहे मायकोरायझा ? मायकोरायझा म्हणजे काय? मायकोरायझा ही एक प्रकारची उपयुक्त बुरशी आहे जी पिकांच्या मुळांशी सहजीवन (Symbiosis) करते. म्हणजेच झाड आणि मायकोरायझा दोघे मिळून एकमेकांना फायदा करून देतात. ♻️  पाहूया, झाडांना मायकोरायझाचा फायदा कसा होतो? - मुळांचा विस्तार वाढतो.  - मायकोरायझा मुळांच्या आजूबाजूला बारीक-जाळीदार धागे (Hyphae) पसरवते. - त्यामुळे झाडाच्या मुळांची कार्यक्षमता १०-२० पट वाढते. - फॉस्फरस सहज उपलब्ध करून देतो. - जमिनीत असलेला फॉस्फरस झाडांना थेट शोषता येत नाही. - मायकोरायझा हा फॉस्फरस विरघळवून झाडाला देतो. - सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता...

जाणून घेऊया, अतिवृष्टी झाल्यावर सोयाबीन शेंगांवर येणार्‍या करपा रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे?

Image
  जाणून घेऊया, अतिवृष्टी झाल्यावर सोयाबीन शेंगांवर येणार्‍या करपा रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे?  नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकासाठी पावसाचे योग्य प्रमाण खूप आवश्यक असते. पण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (जादा पाऊस, पाणी साचणे, जास्त आर्द्रता) सोयाबीन पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये शेंगांवर येणारा करपा रोग (Pod Blight/Anthracnose) हा सर्वात महत्वाचा आहे. हा रोग शेंगांवर आल्यास उत्पादन थेट कमी होण्याची भीती असते. सर्वप्रथम पाहूया, करपा रोग होण्याची कारणे - सलग २–३ दिवस ढगाळ वातावरण व पावसामुळे जास्त आर्द्रता निर्माण होणे. शेतात पाणी साचून राहणे. रोगट अवशेषांवरून (जुनी काडीकचरा) बुरशीची बीजे जिवंत राहणे. घनदाट पिक व वायुविजनाची कमतरता. करपा रोगाची लक्षणे -       - शेंगांवर सुरुवातीला लहान, गडद तपकिरी ते काळसर ठिपके दिसतात. - नंतर हे ठिपके मोठे होऊन शेंग कोरडी, सुरकुतलेली दिसते. - बियाणे नीट भरत नाहीत, अपूर्ण राहतात किंवा कुजतात. - कधी कधी शेंग काळपट होत पूर्णतः खराब होऊ शकते. शेतकरी मित्र हो, आता चिं...

“पांढऱ्या सोन्याचे" रक्षण करा – बोंडे सडण्यावर मिळवा प्रभावी उपाय!

Image
  “पांढऱ्या सोन्याचे" रक्षण करा – बोंडे सडण्यावर मिळवा प्रभावी उपाय! नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस हे शेतकऱ्यांचे “शेतातील पांढरे सोने” मानले जाते. पण उत्पादन घ्यायचे तेव्हा पिकावर अनेक रोग-किडींचा हल्ला होतो. त्यात सर्वात गंभीर व त्रासदायक समस्या म्हणजे बोंडे सडणे. योग्य वेळी माहिती व उपाय न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम, पाहूया बोंडे सडण्याची प्रमुख कारणे - जास्त पाऊस व आर्द्रता – पावसाळ्यानंतर हवेत आर्द्रता वाढते. या वातावरणात बोंड सडवणारे बुरशीजन्य रोग झपाट्याने वाढतात. कीड हल्ला – 1. गुलाबी बोंडअळी - (Pink Bollworm) 2. बोंडअळी - (Spotted/Spiny bollworm) या किडी बोंडात छिद्र पाडतात व आत प्रवेश करून बोंडे नासवतात. > बुरशीजन्य रोग – फ्यूझेरियम, ॲन्थ्रॅक्नोज, अल्टरनेरिया यांसारख्या बुरशीमुळे बोंडे आतून कुजतात. > अयोग्य शेती पद्धती – दाट लागवड, पाण्याचा अतिरेक, निचऱ्याची अडचण, पिकात हवा खेळती न ठेवणे. > पोषक तत्त्वांचा असमतोल – नायट्रोजन जास्त व पोटॅश/कॅल्शियमची कमतरता असल्यास झाडांची रोगप्रतिकारक क्षमता क...

शेतकरी मित्रांनो जमिनीची खरी श्रीमंती म्हणजे - जिवाणू आणि सेंद्रिय कर्ब !

Image
  शेतकरी मित्रांनो जमिनीची खरी श्रीमंती म्हणजे - जिवाणू आणि सेंद्रिय कर्ब ! नमस्कार, शेतकरी मित्रांनो ! सर्वप्रथम आपले खेतीवाले भैय्या ह्या ब्लॉग पेज वर हार्दीक स्वागत ! आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या शेतीच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण अनेक वर्षांपासून रासायनिक खतं वापरत आलो आहोत, पण तुम्हाला माहिती आहे का, ही खतं आपल्या जमिनीला आतून पोखरत आहेत आणि आपल्या उत्पन्नावरही परिणाम करत आहेत. खेतीवाले भैय्या ह्या ब्लॉगवर आज आपण समजून घेऊया की शेतजमिनीची खरी ताकद कशात आहे आणि ती कशी टिकवून ठेवायची? शेतकरी मित्रांनो जमिनीची खरी श्रीमंती म्हणजे - जिवाणू आणि सेंद्रिय कर्ब ! आपल्याला वाटतं की रासायनिक खतं टाकली की भरपूर पीक येतं, पण हे अर्धं सत्य आहे. जमिनीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी, जमीन 'जिवंत' असणं गरजेचं आहे. जिवंत म्हणजे काय? तर ज्या जमिनीत भरपूर सूक्ष्म जिवाणू (microbes) आहेत, ती जमीन जिवंत असते. तुम्ही ऐकून थक्क व्हाल, पण एका मूठभर मातीत करोडो जिवाणू असतात. हे जिवाणू म्हणजे जमिनीचे खरे कामगार आहेत. ते जमिनीतील पोषक तत्त्वं आणि पिकांना सहज मिळवून द...

का वाढतोय शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे तसेच जैविक उत्पादनांकडे?

Image
  का वाढतोय शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे तसेच जैविक उत्पादनांकडे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या काळात शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके आणि Growth Promoters यांचा प्रचंड वापर होतो. कमी कालावधीत चांगले व जास्त उत्पादन मिळाले तरी यामुळे मातीची सुपीकता, पिकांची गुणवत्ता आणि मानवी आरोग्य यावर नकारात्मक परिणाम होतोय. त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल हळूहळू जैविक शेतीकडे वळताना दिसतो. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जैविक शेती म्हणजे काय? जैविक शेती ही निसर्गाशी सुसंगत शेती पद्धत आहे. यात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांऐवजी जैविक खते, गांडूळखत, जिवाणू खते, शेणखत, कंपोस्ट, पिकांचा अवशेष व जैविक कीडनाशके वापरले जातात. शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे वाढण्याची कारणे-  १. मातीची सुपीकता टिकवणे (Soil Fertility) रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची रचना, सूक्ष्मजीवसंख्या व सेंद्रिय अंश कमी होतो. जैविक शेतीत नैसर्गिक खतांचा वापर करून मातीतील जीवन परत आणता येते. २. उत्पादनाचा दर्जा सुधारतो (Product Quality)...

हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर मिळवा सर्वोत्तम नियंत्रण !

Image
 हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर मिळवा सर्वोत्तम नियंत्रण ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, हळद व आले ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार आहेत. पण या पिकांमध्ये कंदमाशी (Rhizome fly) व कंदसड (Rhizome rot) हे कीड व रोग मिळून मोठे नुकसान करतात. योग्य वेळी ओळख व नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात 40-60% घट येऊ शकते. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे, हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर सर्वोत्तम नियंत्रण कसे मिळवायचे ?  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- चला पाहूया, कंदमाशी व कंदसड ह्या समस्या निर्माण होण्याची कारणे , त्याची लक्षणे, त्यामुळे होणारे नुकसान, तसेच त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे ? > कंदमाशी प्रामुख्याने कीटकामुळे (माशीची अंडी व अळी). > कंदसड प्रामुख्याने बुरशीजन्य रोगामुळे (ओलसर व पाणी साचलेल्या परिस्थितीत). 1. कंदमाशी (Rhizome Fly) लक्षणे - - माशी पाने व कंदामध्ये अंडी घालते. - अळी कंदामध्ये घुसून आतील भाग खाऊन टाकते. - कंदावर तपकिरी/काळसर छिद्रे दि...

हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते एक समृद्ध शेतीचा आधार !

Image
 हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते एक समृद्ध शेतीचा आधार ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो ब्लॉग चा विषय आहे तो अगदी खास ! हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते, काय आहे त्यांचे महत्व ? शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की नायट्रोजन हे झाडांसाठी सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे, परंतु आपल्या जमिनीत नायट्रोजन भरपूर असूनही झाड थेट त्याचा उपयोग करू शकत नाही. मग काय होतं? आपण युरिया वापरतो. पण युरिया महाग आहे, आणि त्याचा अति वापर जमिनीची सुपीकता कमी करतो. यासाठी पर्याय काय?? तर पर्याय अगदी सोपा व अगदी खास आहे! इथेच नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खत मदतीला येतात. हे सूक्ष्म जीव जमिनीतला नायट्रोजन झाडाला पचेल अशा स्वरूपात उपलब्ध करून देतात. त्यामुळे झाड हिरवंगार वाढतात, मुळे मजबूत होतात आणि उत्पादन वाढतं. चला पाहूया,  नायट्रोजनचे महत्व - > नायट्रोजन हा पिकांसाठी सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य घटक आहे. > झाडांची वाढ, पाने, हिरवळ, प्रकाशसंश्लेषण, दाण्यांचा व फळांचा आकार या सगळ्यासाठी नायट्रोजन आवश्यक असतो. > पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात म्हणजेच शाक...

नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते - शेतीसाठी एक वरदान"

Image
  नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते - शेतीसाठी एक वरदान"! नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा अतिरेकी वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता घटते, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते. अशा परिस्थितीत जैविक जिवाणू खते शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरत आहेत. यामध्ये विशेषतः नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू हे खत पिकांसाठी वरदानच आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- चला पाहूया,  नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू म्हणजे काय? हवेतील नायट्रोजन (N₂) हा वायुरूप स्वरूपात असतो, झाडांना थेट याचा उपयोग करता येत नाही. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू (Nitrogen Fixing Bacteria) हवेतील नायट्रोजनचे शोषण करून ते पिकांना उपयोगी पडणाऱ्या अमोनिया किंवा नायट्रेट स्वरूपात रूपांतर करतात. त्यामुळे पिकांना पुरेसा नायट्रोजन मिळतो आणि पिकांची वाढ जोमदार होते. Biological Nitrogen Fixation नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू म्हणजे काय हे समजले, आता पाहूया ते जिवाणू नेमके कोण...