Posts

Showing posts from October, 2025

बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!”

Image
  बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे  — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!” नमस्कार शेतकरी मित्रांनो, बटाटा हे आपल्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि उत्पन्न देणारे भाजीपाला पीक आहे. उच्च उत्पादनासाठी मातीतील पोषणतत्वांचे संतुलन असणे हे फार आवश्यक असते. बहुतांश वेळा आपण फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) या प्रमुख अन्नद्रव्यांवर लक्ष केंद्रित करतो; परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात न घेतल्यास बटाटा पिकाची योग्य वाढ, दर्जा आणि उत्पादनावर मोठा परिणाम होतो. 👉 “संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे  — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!” सर्वप्रथम पाहूया, सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय? सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे अशी तत्वे जी पिकांना अत्यल्प प्रमाणात लागतात, पण त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यात मुख्यतः — लोखंड (Fe), मॅंगनीज (Mn), झिंक (Zn), तांबे (Cu), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) यांचा समावेश होतो. बटाटा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य पाहूया -  लोह (Fe) - क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक. कमतरतेची लक्षणे - पाने पिवळी पडणे, पण शिरा ह...

ढगाळ व पावसाळी वातावरणात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल?

Image
ढगाळ व पावसाळी वातावरणात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल? नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे वेल वर्गीय पिकांवर (कारले, दोडका, भोपळा, काकडी इ.) पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. या काळात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे झाडांची वाढ मंदावते, पाने पिवळी पडतात आणि फुलगळ/फळगळ वाढते. त्यामुळे योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वेलवर्गीय पिकांचे (भोपळा, दोडका, कारले इ..) उत्पन्न आणि दर्जा खत व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचा संतुलित वापर हा वेलपिकांच्या सातत्यपूर्ण वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे. 🌤️ हवामानाचा परिणाम सूर्यप्रकाश कमी → प्रकाशसंश्लेषण घटते → झाडांची वाढ मंदावते ओलसर वातावरणामुळे डाऊनी मिल्ड्यू, पानांवर डाग, शेंडा कुजणे असे रोग वाढतात. मुळांना ऑक्सिजन कमी मिळाल्याने मुळकुज होऊ शकते. काय उपाययोजना कराव्यात यावर? 1️⃣ ड्रेनेज (निचरा) सुधारावा — पाण्याचा साचलेला थर लगेच काढा. 2️⃣ योग्य उत्पादनांची आळवणी - पिकांच्या जोमदार वाढीसाठी, अधिक फुटव्यांसाठी तसेच बेसल डोस चा अपटेक वाढविण्यासाठी  👉🏻 पोषक किट (1 किट/एकर) 3️⃣ सूक्...

अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत “फुटवा कमी? चिंता नको ! योग्य पोषण आणि व्यवस्थापनाने बाग पुन्हा फुलवा!"

Image
  अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत “फुटवा कमी? चिंता नको ! योग्य पोषण आणि व्यवस्थापनाने बाग पुन्हा फुलवा!" नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, सध्या अनेक द्राक्ष उत्पादकांना अतिवृष्टीमुळे बाग फुटण्यात अडचणी येत आहेत, यामुळे बरेच शेतकरी चिंतेत दिसत आहेत, परंतु काळजी करू नका योग्य पोषण आणि व्यवस्थापन करून द्राक्ष बाग पुन्हा एकदा नव्याने फुलवा!" अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर अपेक्षित प्रमाणात फुटवा येत नाही, नवीन कोंब कमजोर पडतात आणि उत्पादनावर थेट परिणाम दिसतो. चला पाहूया या समस्येची कारणं, परिणाम आणि त्यावरचे प्रभावी उपाय कोणते ? ♻️अडचणीची प्रमुख कारणे: जमिनीत पाण्याचा अतिरेक - सततच्या पावसामुळे मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो, परिणामी फुटवा आणि वाढ खुंटते. मुळांची सड (Root Rot)- ओलसर जमिनीत बुरशीजन्य रोग वाढतात, ज्यामुळे मुळांचे नुकसान होते. अन्नद्रव्य शोषणात घट- पाण्याचा अतिरेक झाल्याने झाडांची पोषण घेण्याची क्षमता कमी होते. फुटव्यावर काळोखी येण्यास अडचण व पानगळ- जास्त आर्द्रतेमुळे पानांवर व फुटव्यांवर काळोखी दिसत नाही, तसेच प...

"तूर पिकाची उत्पादकता वाढीसाठी महत्वाची गुरुकिल्ली!"

Image
 "तूर पिकाची उत्पादकता वाढीसाठी महत्वाची गुरुकिल्ली!" नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये तूर (तूर डाळ) हे एक अत्यंत महत्वाचे डाळीचे पीक आहे. शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन आणि दर्जेदार दाणे मिळवण्यासाठी योग्य शेती व्यवस्थापन आवश्यक असते. चला तर पाहूया, तूर उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागते. तूर पिकातील उत्पादन वाढवायचे असल्यास — योग्य वाण, बियाणे प्रक्रिया, संतुलित पोषण, आणि जैविक उपायांचा समावेश असलेले एकत्रित शेती व्यवस्थापन अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि जैविक जिवाणू खतांचा समावेश हा भविष्यातील शाश्वत शेतीचा पाया आहे. तूर पिकातून चांगले उत्पादन घेण्यासाठी फक्त बी टाकणे पुरेसे नसते. योग्य व्यवस्थापन केल्यास दुप्पट उत्पादन मिळू शकते. पाहूया त्या ५ महत्वाच्या टिप्स.  1️⃣ उत्तम दर्जाचं बी आणि बीजप्रक्रिया - नेहमी जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचं प्रमाणित बीज वापरा (उदा. BDN-708, BSMR-736). - लागवडीपूर्वी बीजावर Rhizobium आणि PSB जैवखत लावल्यास मुळांची वाढ चांगली होते व नत्र, फॉस्फरसचे शोषण वाढते. - यामुळे पिकाची सुरुवात मजबु...

कांदयाची हिरवीगार पात, मुळांचा विस्तार, वजनदार कांदा – हे शक्य झालेय पामेला ने !

Image
  कांदयाची हिरवीगार पात, मुळांचा विस्तार, वजनदार कांदा – हे शक्य झालेय पामेला ने ! नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, कांदयाची पात हिरवीगार असणे म्हणजे – भरघोस उत्पादनाचा पाया होय! कांदा पिकात पात म्हणजेच झाडाचा जीव असतो. पात जितकी हिरवीगार, टवटवीत आणि मजबूत, तितकी झाडाची फोटोसिंथेसिस (अन्ननिर्मिती) प्रक्रिया अधिक परिणामकारक होते. परिणामी कांदा मोठा, वजनदार आणि साठवणक्षम तयार होतात. पण हवामानातील बदल, अन्नद्रव्यांची कमतरता, आणि ताण (stress) यामुळे पात पिवळसर होणे, वाकड्या होणे किंवा लवकर वाळणे अशी समस्या दिसून येते. यासाठी आपण आज एका उत्पादनाबद्दल जाणून घेणार आहोत ते आहे प्रणिल ऍग्री चे पामेला (Sea weed Extract) 🌊 पामेला (Seaweed Extract) काय आहे ? ‘पामेला’ म्हणजे समुद्रातील शैवालांपासून तयार केलेले एक नैसर्गिक जैवउत्तेजक (bio-stimulant) आहे. यात विविध अमिनो अ‍ॅसिडस्, हार्मोन्स (सायटोकिनिन्स, ऑक्सिन्स, गिबरेलिन्स), सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि नैसर्गिक वाढ प्रोत्साहक घटक असतात. हे घटक पिकांच्या पेशींवर थेट परिणाम करून त्यांची वाढ, मूळांची मजबुती आणि पानांची हिरवळ वाढवतात. 🌱 पामेल...