Posts

Showing posts from April, 2025

जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर !

Image
 जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर ! शेतकरी बांधवांनो, दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांवरील वापर, बदलत्या पीक पद्धती, वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची वाढती गरज त्यामुळे जमिनीवर येणारा ताण ह्या सर्व कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. गरज जमिनीची सुपीकता टिकवण्याची, गरज जीवाणू खते वापरण्याची ! जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे - ▫️रासायनिक खतांचा अतिवापर ▫️सेंद्रिय खतांचा अभाव  ▫️एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धत  ▫️दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज, त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार अश्या विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल आणि दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर आपण आपल्या शेतात जिवाणू खते वापरणे फार महत्वाचे आहे.  थोडक्यात पाहूया, जिवाणू खते वापरल्याने होणारे फायदे  - ▫️ मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना मिळते. ▫️ मुळांची वाढ चांगली होऊन, त्यांची पोषण क्षमता वाढते. ▫️ मातीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन टिकून राहते. ▫️ पिकांची रोग-प्रतिकारशक्ती वाढते. ▫️ सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. ----------------...

समृद्ध शेतीसाठी, पिकांना देण्यात येणारे पाणी कसे असावे ?

Image
  समृद्ध शेतीसाठी, पिकांना देण्यात येणारे पाणी कसे असावे ? शेतकरी मित्रांनो, खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग पेज वर आपले सहर्ष स्वागत आहे. दिवसेंदिवस शेतात तसेच पिकांच्या लागवडीच्या पद्धतींमध्ये बदल होतांना आपल्याला दिसत आहेत. पीक वाढीसाठी खतांची योग्य मात्रा देणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे पिकांना योग्य व स्वच्छ पाणी देणे हे फार अत्यावश्यक असते. आपण ह्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शेतासाठी योग्य पाणी म्हणजे,  👉🏻 पाण्याचा (पी.एच/pH) सामू 👉🏻 पाण्याचा TDS 👉🏻 पाण्यातील EC (विद्युत वाहकता) यांचे योग्य प्रमाण  शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असते.  पाण्याची योग्य पीएच श्रेणी, योग्य TDS आणि योग्य EC (विद्युत वाहकता) असणे हे पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देते.  योग्य pH, TDS आणि EC हे पिकांच्या जोमदार वाढीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात.  खाली पाण्याचे मुख्य घटक — pH (सामू), TDS...

डाळिंब बागेतील चौकी अवस्थेसाठी फायदेशीर असे नियोजन !

Image
डाळिंब बागेतील चौकी अवस्थे साठी  फायदेशीर असे नियोजन !   नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉग चा महत्वाचा असा विषय आहे तो म्हणजे डाळिंब फळ पिकातील चौकी अवस्था.  डाळिंब (Pomegranate) हे एक अतिशय लाभदायक आणि निर्यातक्षम फळपीक आहे.  आपल्या सर्वाना माहीतच असेल डाळिंब लागवडीत फळधारणेपूर्वी काही विशिष्ट व महत्वाच्या वाढीच्या अवस्था असतात, त्यातील एक महत्त्वाची वाढीची  अवस्था म्हणजे "चौकी अवस्था" . ही अवस्था डाळिंब बागेच्या निरोगी उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते.  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जाणून घेऊया, डाळिंब बागेतील चौकी अवस्था म्हणजे काय ? -  चौकी अवस्था ही फळधारणा होण्यापूर्वीची अवस्था आहे. डाळिंबाच्या फळझाडामध्ये नवीन फुले येण्याआधीची अवस्था – फुले येण्याच्या अगोदरची 15 ते 20 दिवसांचा कालावधी.  डाळिंबाची 'चौकी अवस्था' म्हणजे डाळिंबाच्या फळाची वाढ होणारी अवस्था. आपण डाळिंबाच्या 'चौकी अवस्था' पाहत असल्यास, आपण डाळिंबाच्या फळाच्या विकासावर लक्ष देत आ...

मिरची पिकातील किडी आणि रोगांवर प्रभावी नियंत्रण !

Image
 मिरची पिकातील किडी आणि रोगांवर प्रभावी नियंत्रण ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यावर येणाऱ्या किडींचे आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत शेतीसंदर्भात नवनवीन व अगदी महत्वाची अशी माहिती देत असतो.  ह्या ब्लॉग मध्ये आपण मिरची पिकावर येणारे कीड आणि रोग आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवायचे ? याबाबतची माहिती घेणार आहोत.  मिरची (Chilli) पिकात अनेक प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. योग्य वेळेवर नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. खाली मिरची पिकातील प्रमुख किडी व रोगांची लक्षणे व त्यांचे प्रभावी नियंत्रण यांची माहिती दिली आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिरची पिकातील प्रमुख किडी आणि त्यांचे नियंत्रण -  1. मिरची पिकातील पाने कुडतरणारी आणि फळ खाणारी अळी  (Spodoptera litura) लक्षणे : पाने कुडतरतात, फांद्या नष्ट करतात ,फळांवर छिद्रे पडतात...

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

Image
  द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी  द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन  ! द्राक्ष बागायतदार बंधूंनो,  आज आपण ह्या लेखात माहिती घेणार आहोत ती म्हणजे  'खरड छाटणी' केल्यानंतर करण्यात येणाऱ्या महत्वाच्या व्यवस्थापनाविषयी   द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरड छाटणी व्यवस्थापन कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्व आहे.  - द्राक्षातील खरड छाटणीस फळ (गोडीबहर) छाटणीचा पाया म्हणतात.  थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्या प्रकारे काडयांची निर्मीती होते व काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्वाची यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नविन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यामधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून...