Posts

Showing posts from November, 2024

थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी?

Image
 थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी? द्राक्ष शेती ही नाजूक व फायदेशीर पिकांपैकी एक आहे. थंडीच्या हंगामात योग्य काळजी घेतल्यास द्राक्षांचे उत्पादन उत्तम होते, अन्यथा थंड हवामानामुळे फुलोरा गळ, फळकुज, आणि रोगांची समस्या निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांनी थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची योग्य प्रकारे निगा राखणे आवश्यक आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- थंडीच्या काळातील द्राक्ष पिकाला भेडसावणाऱ्या समस्या - - थंड वातावरणाचा परिणाम: द्राक्षाच्या झाडांना 15°C पेक्षा कमी तापमान असल्यास झाडाची वाढ खुंटते. - ओलसर वातावरण: धुके व थंड हवेमुळे फुफुंदजन्य रोग (जसे की डाऊनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू) वाढतात. - फुलोरागळ, फळगळ व फळकुज : थंडीच्या तीव्रतेमुळे फुलगळ, फळगळ व फळकुज होण्याची शक्यता वाढते. - किडींचा प्रादुर्भाव: थंड वातावरणात मावा, मिलिबग, आणि तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. - द्राक्ष पिकाची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय १. तापमान नियंत्रण - थंडीच्या तीव्रतेपासून पिकाचे संरक्षण ...

द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढविण्यासाठी व घडाच्या एकसमान आकारासाठी उपाययोजना

Image
  द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढविण्यासाठी व घडाच्या एकसमान आकारासाठी  उपाययोजना  द्राक्ष वेलींच्या ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष वाढीच्या विविध अवस्थेत वेगवेगळे परिणाम मिळविण्यासाठी संजीवकाचा (Plant Growth Regulator) जीएचा (GA) वापर केला जातो. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढणे का महत्वाचे असते? - द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढल्याने द्राक्ष मण्यांच्या आकारमान वाढीस मदत होते. - मण्यांची विरळणी (थिनिंग) द्राक्षात थिनिंग ला खूप महत्त्व आहे. द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढल्याने मण्यांची विरळणी ही कमी प्रमाणात करावी लागते. - मण्यांचा आकार वाढतो  द्राक्ष घडात योग्य ती जागा असल्याने मण्यांच्या वाढीस वाव मिळतो, परिणामी मण्यांचा आकार वाढतो व द्राक्ष घडाची गुणवत्ता सुधारते. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- उपाययोजना - - पाकळ्यांची वाढ, मण्यांचा आकार वाढवण्यासाठी सुरुवातीपा...

मिली बग: शेतीतील एक गंभीर कीड समस्या व त्यावरील नियंत्रण

Image
  मिली बग: शेतीतील एक गंभीर कीड समस्या व त्यावरील नियंत्रण  पपई पिकावरील मिली बग चा प्रादुर्भाव  मिली बग ही एक महत्त्वाची कीड आहे जी अनेक पिकांवर हल्ला करते. ही कीड पिकांचे उत्पादन कमी करून मोठे आर्थिक नुकसान करू शकते. चला, मिली बग किडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिली बग काय आहे? मिली बग ही पांढऱ्या रंगाची, लहान, मऊ शरीराची कीड आहे जी झाडांच्या खोडावर, पानांवर आणि फळांवर जमा होऊन रस शोषून घेते. त्यामुळं झाडांची वाढ खुंटते, फळांची गुणवत्ता कमी होते आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ मिली बग च्या प्रादुर्भावाने काय नुकसान होते ? - रस शोषण: मिली बग झाडांच्या रसाचा शोषण करते, ज्यामुळे झाडं कमकुवत होतात. - सोती मोल्डची वाढ: मिली बग चिकट स्राव करते, ज्यामुळे सोती मोल्ड नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. - फळांचा दर्जा खालावतो: फळे खराब होतात...

द्राक्ष बागेतील घड जिरणे व गोळी घड होण्याच्या समस्येवर उपाययोजना..

Image
  द्राक्ष बागेतील घड  जिरणे  व गोळी घड होण्याच्या समस्येवर उपाययोजना द्राक्ष बागेची छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागायतदारांसमोर बरीच आव्हाने असतात, त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे घड जिरणे किंवा घडाचे गोळी घडात रूपांतर होणे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- घड का जिरतो ? घड बाहेर येत असताना वेलीमध्ये अनेक वाढीच्या हालचाली होत असतात त्यामध्ये जर जिब्रेलिक ऍसिड चे प्रमाण वाढले व सायटोकायनिनचे प्रमाण कमी झाले, तसेच ढगाळ वातावरण असल्यास देखील घड जिरण्याची समस्या द्राक्ष बागेत उद्भवते. --------------------------------------------------------------------------------------------------------------------- घड जिरणे किंवा गोळी घडात रूपांतर होण्याची कारणे - 1. खरड छाटणी योग्य वेळ-   द्राक्ष बागेत खरड छाटणी वेळेवर न होता उशिरा झालेली असल्यास सूक्ष्म घड निर्मितीस पुरेसा वेळ मिळत नाही. उशिरा झालेल्या छाटणीमुळे अन्ननिर्मिती होऊन त्याची काडीमध्ये साठवणीसाठी आवश्यक तितका कालावधी मिळत नाही. परिणामी घड...

आंबा पिकामध्ये मोहोर येण्याच्या काळातील व्यवस्थापन आणि किड-रोग नियंत्रण

Image
  आंबा पिकामध्ये मोहोर येण्याच्या काळातील व्यवस्थापन आणि किड-रोग नियंत्रण   आंबा उत्पादनामध्ये मोहोर येण्याचा काळ हा अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या कालावधीत पिकाची योग्य काळजी घेतल्यास मोहोर टिकून राहतो आणि फळधारणा चांगली होते. परंतु याच वेळी विविध रोग आणि कीडांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुढील उपाययोजना करणे उपयुक्त ठरते:   --------------------------------------------------------------------------------------------------------------------- मोहोर येण्याआधी घ्यायची काळजी  - 1.⁠ ⁠फळधारणा सुधारण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन:      - झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम संतुलित प्रमाणात द्यावे.      - झिंक (Zinc) आणि बोरॉन (Boron) ची कमतरता असल्यास ती दूर करण्यासाठी स्प्रे करावा.   2.⁠ ⁠पाणी व्यवस्थापन:      - मोहोर येण्याच्या 20-25 दिवस आधी झाडांना पाणी देणे बंद करावे.      - मोहोर दिसू लागल्यावर झाडांना हलक्या प्रमाणात पाणी द्यावे....

द्राक्ष बागेत घडाची आकर्षक लांबी मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादन "झोमा गोल्ड"

Image
 द्राक्ष बागेत घडाची आकर्षक लांबी मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादन "झोमा गोल्ड" शेतकरी बांधवांनो, आपणास हे ठाऊक च आहे की, दर्जेदार द्राक्ष निर्मितीमध्ये द्राक्षघड व द्राक्षमणी यांच्या आकारमानाला खूप महत्व असते. द्राक्ष घडाच्या आकारमानावरून त्याची गुणवत्ता ही ठरवली जाते.  ------------------------------------------------------------------------------------------------------ द्राक्ष घडाच्या लांबीसाठी महत्वाच्या बाबी - द्राक्ष घडाची लांबी वाढविण्यासाठी घडाच्या देठाची व पाकळ्यांची लांबी वाढणे गरजेचे असते.  घडाची लांबी वाढल्यामुळे मण्यांच्या आकारमान वाढीसाठी मदत होते तसेच घडाला योग्य अशी सुबकता देखील प्राप्त होते.  आकारमान वाढीसाठी पेशींची संख्या वाढीबरोबर पेशींची लांबी वाढणेदेखील महत्त्वाचे असते. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले घटक जसे की मण्यांचा आकार, घडांची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी या बाबी मिळवण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या व प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ------------------------------------------...

हरभऱ्याच्या पिकामध्ये येणारा मर रोग: कारणे, लक्षणे, आणि नियंत्रण

Image
 हरभऱ्याच्या पिकामध्ये येणारा मर रोग: कारणे, लक्षणे, आणि नियंत्रण हरभरा हे शेतकऱ्यांचे प्रमुख रब्बी हंगामातील पीक आहे, परंतु या पिकावर अनेक रोगांचे संकट असते. त्यामध्ये "मर रोग" (Wilt Disease) हा एक प्रमुख व धोकादायक रोग आहे. हा रोग पिकाचे मोठे नुकसान करू शकतो. हरभऱ्यातील मर रोगाविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मर रोग कशामुळे येतो? मर रोग मुख्यतः बुरशीजन्य (फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम - *Fusarium oxysporum*) आणि जिवाणूजन्य (*Ralstonia solanacearum*) या रोगकारकांमुळे होतो. हे रोगकारक मुळांवर हल्ला करून पिकाचा रस शोषून घेतात, ज्यामुळे झाड वाळून जाते. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मर रोग कधी आणि कोणत्या वातावरणात येतो? 1. हंगाम:      - मर रोग साधारणतः हरभऱ्याच्या अंकुरणानंतर 20-40 दिवसांमध्ये दिसून येतो.   2. वातावरणीय कारणे:     ...

अशी घ्या थंडी च्या दिवसांमध्ये आपल्या टोमॅटो पिकाची काळजी !

Image
 अशी घ्या थंडी च्या दिवसांमध्ये आपल्या टोमॅटो पिकाची काळजी ! टोमॅटो रोपांच्या लागणीनंतर, रोपाच्या वाढीसाठी लागणाऱ्या संपूर्ण गरजा पूर्ण करणे व त्या शोधणे आवश्यक असते. टोमॅटो पीक हे जास्त थंड हवामान सहन करू शकत नाही त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो. वाढत्या रोपांना भरपूर सूर्यप्रकाश, सातत्यपूर्ण उबदारपणा, पुरेसे पाणी व निरोगी माती व योग्य ते खतांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. शेतकरी बांधवांनो, सध्या तापमानामध्ये अचानक घट होत असून रात्रीच्या वेळी खूप गारवा जाणवत आहे. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकाची योग्य प्रकारे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कमी तापमानामुळे पिकांवर ताण येऊ शकतो आणि याचाच परिणाम उत्पादनावर देखील होऊ शकतो.   थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात घट होते, अशा गारव्याच्या वातावरणामध्ये टोमॅटो पिकासाठी करावयाच्या उत्तम उपाययोजना खालील प्रमाणे दिल्या आहेत. टोमॅटो पिकाची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय- 1. पाणी व्यवस्थापन :-  पिकाला वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी द्या. गारव्याच्या काळात जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे असते. 2. तापमान नियंत्रण :- ...

कलिंगड/टरबूज पिक वाढीसाठी लागवड व्यवस्थापन

Image
कलिंगड/टरबूज पिक वाढीसाठी लागवड व्यवस्थापन  महाराष्ट्रात कलिंगड पिकाची लागवड ही अतिशय उल्लेखनीय आहे. वर्षानुवर्षे आपण बघत आलो आहोत की या  पिकाच्या लागवडीमुळे त्यापासून मिळणारे उत्पादनही अतिशय उत्कृष्ट मिळते. कलिंगड पिकाची मागणी ही उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त दिसून येते. कलिंगड पिकाला आवश्यक असणारी जमीन- या पिकासाठी मध्यम प्रकारची काळी जमीन योग्य असते.  अशा प्रकारच्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. हवामान - कलिंगड वाढीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान उत्कृष्ट ठरते. तसेच भरपूर सूर्यप्रकाश देखील आवश्यक असतो.  24 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान हे कलिंगड पिकाच्या वेलींच्या व फळांच्या वाढीसाठी उत्तम असते. लागवड कधी करावी? साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कलिंगड लागवडीला शेतकरी सुरुवात करतात. लागवड पद्धत- सध्या शेतकरी हे कलिंगड पिकाची लागवड ही मल्चिंग पद्धतीने करण्यावर भर देत आहे. बियाण्यांची आवश्यकता - कलिंगड पिकासाठी एकरी १ ते १.२५ किलो बियाण्यांची आवश्यकता असते.  कलिंगड पिकातील महत्त्वाच्या जाती- शुगर बेबी - खाण्यास अतिशय गोड लागते. ऑग...